गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग 20

वेचलेल्या विचार कणिका - भाग 20

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


पूजा

अपवित्र पवित्र व्हावे 

बाह्याभ्यंतर शुचि:

कलशात गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी या भारतातील विविध भागातून वाहणाऱ्या सात नद्यांचे पाणी कल्पनेने भरुन त्याचे पूजन. 

जणू भारतमातेला वंदन व भारतभूमी सुजल, सुफल करणाऱ्या नद्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त! 

सागरातून उत्पन्न झालेल्या व विष्णूंनी हातात धरलेल्या शंखाला वंदन! शंखध्वनी म्हणजे पौरूषाला आवाहन व आत्मविश्वास जागृती. 


घंटानाद - शुभशक्तींना आवाहन व दुष्ट शक्तींना निघून जाण्यासाठी सूचना. 


दीप- अंधार नाहीसा करून प्रकाश निर्माण करणाऱ्या दीपाचे या त्याच्या जगाचे हित करणाऱ्या कार्याला अभिवादन!

--------------------------------


गणपती पूजन

गणांचा पती म्हणजे लोकनायक असलेल्या व बुद्धी दात्या ' विनायक ( विशेषत्वाने पुढारी बनलेल्या) याला वंदन! 

ब्रम्हाचे प्रतीक असलेला ओम् गणेशात सामावलेला आहे त्याची आसनमांडी म्हणजे अकार, विशाल पोट म्हणजेच ऊकार, व महागंडस्थल युक्त मस्तक म्हणजे मकार. 

शिवाय गणपती ही संघटनेचीही देवता होय. समाजजीवन समृद्ध, संपन्न व्हावे ह्यासाठी आपण सर्व प्रयत्नरत राहू या!

------------------------------------------

दीनदयाळजींना अभिवादन व त्यांच्या काही विचारांचे स्मरण

भगवान श्रीकृष्ण याचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे त्यांचे राष्ट् प्रेम त्या साठी त्यांनी व्यक्तिगत मानापमानाची चिंता केली नाही, 

गोकुळ सोडुन मथुरेला जावे लागले.

कंसवधानंतर स्वत: राज्यावर न बसता ते उग्रसेनाला दिले.

जरासंधाला सोळा वेळा पराभूत केले पण केवळ आपल्यामुळेच ही आक्रमणे होत आहेत हे लक्षात घेऊन पळपुटेपणा स्वीकारूनही मथुरा सोडली. शस्त्रधारण न करण्याची प्रतिज्ञा तोडून भीष्मांवर शस्त्र चालवले.

कृत्रिम संध्याकाळ निर्माण करुन जयद्रथाला मारले.

जमिनीत घुसलेले रथाचे चाक काढत असलेल्या कर्णाला मारले. 

नरकासुराच्या कारागृहाला सोळा हजार स्त्रियांना सोडवून त्यांच्याशी विवाह केला.

या सर्व गोष्टी कृष्णाने केवळ राष्ट्र हित लक्षात घेऊन केल्या.

-प्रेरणापुंज लेखक दीनदयाळ उपाध्याय

----------------------------------------------

काही विचार

दैवतापासून ज्याला विभक्त होता येत नाही तो भक्त.

अविश्वासाचे वातावरण नाहीसे करण्यासाठी दोन प्रकारचे परस्पर संबंध हवे.वरुन खाली व खालून वर.


साक्षेप- निश्चित ध्येय' निश्चित मार्ग, तीव्र इच्छाशक्ती, दृढ निर्धार

 चांगली कृती पेरा, त्यातून चांगल्या सवयी, त्यातून चांगले चारित्र्य निर्माण होईल. 

जगाच्या सुखासाठी काया, वाचा, मनाने केलेले वर्तन म्हणजे अहिंसा. 

बेजबाबदार पण योग्य असणे हे जबाबदार व अयोग्य असण्यापेक्षा केव्हाही चांगले. 

कार्यकर्त्यांना एक संदेश

 घाई करा पण सावकाश

-----------------------------------------

प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी वंदन

सद्गुणांचा अधिष्ठात्या गणनायकाला वंदन

परा, पश्यती, मध्यमा, वैखरी या चारी वाणींची प्रेरक शक्ती असलेल्या सरस्वतीला वंदन. 

कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवणार्या प्रभू रामचंद्र यांना वंदन. 

हिमवंताचा रजतकिरीट धारण करणाऱ्या व हिंदी महासागर जिचे चरण नित्य धूत आहे अशा हिदूभूमीला वंदन. 

जिने मातेप्रमाणे आमचे संवर्धन केले आहे त्या मातृभूमीला प्रणाम. 

जन्मदात्या मातेला नमन. 

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, पूर्ण पुरूष भगवान श्रीकृष्ण, राष्ट्रगुरू समर्थ रामदास, क्षत्रिय कुलवतंस छत्रपती शिवाजी, ऋषिवर श्री दयानंद सरस्वती, राष्ट्र द्रष्टे स्वामी विवेकानंद या व सर्व मार्गदर्शकांना प्रणाम. 

सप्त चिरंजीव यांना नमस्कार. 

अल्पायुषी म्हणून जन्माला आलेल्या पण स्वप्रयत्नाने ज्यांनी दीर्घायुष्य प्राप्त केले त्या मार्कंडेय यांना नमन. 

चराचरातील सर्व शक्तींनो, तुम्हाला साष्टांग प्रणिपात. 

-------------------------------------------

सात चक्र

मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र. 


अग्निच्या सात ज्वाला सात समिधा, सात यज्ञ, सात लोक

सात धातू

रस, रक्त, मास, मज्जा, अस्थि, मेद, वीर्य

----------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा