शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

भारतभूस्तोत्र -3

शुभ्रं धर्म ध्वजं मातु: किं वा राशीकृतम यश:।
रौप्यं वा मुकुटम दिव्यं वन्देs हं तं हिमालयं ।।३।।
भारतभू म्हटले कि ताबडतोब डोळ्यांसमोर साकारतो तो उत्तरेकडचा उत्तुंग अपराजेय प्रहरीच जणू असलेला हिमालय. ह्या श्लोकात हिम +आलय म्हणजेच बर्फाचे घर असलेल्या हिमालयाला वंदन केले आहे. मातेचा शुभ्र असा धर्मध्वजच जणू. शुभ्र म्हणजे अगदी निष्कलंक! पांढऱ्या रंगावर अगदी बारीकसाही डाग पडला तर लगेच कळतो. ह्या हिमाद्रिने आपली कीर्ती हजारो वर्षांपासून अगदी निष्कलंक राखली आहे.

तो भारतमातेचा धर्मध्वज आहे. धर्म म्हणजे धारयति इति धर्म:। मनुष्य जीवनाचे धारण करणाऱ्या सर्व गोष्टी मग ते शीलचारित्र्य असेल, नियमांचा काटेकोरपणा असेल, सर्वांच्या कल्याणाचा विचार असेल, परोपकार बुद्धी व सेवावृत्ती असेल, सर्वे S पि सुखिन: संतु असा विचार असेल, आदर व आदरातिथ्य करणारे वर्तन असेल. अशा सर्व गोष्टीना दुर्गुणांचा, दुराचाराचा दुर्वृत्तिचा जराही स्पर्श झालेला नसेल तर स्वाभाविकच शुभ्र धवलता तेथे असणार. ही शुभ्रताच जणू बर्फाद्वारे प्रगट झाली आहे कि काय असे वाटते.

दुसरे रूपक आहे, 'राशीकृतम यश:'। यशाची जणू राशीच। यश म्हणजे प्रयत्नांती प्राप्त केलेले साध्य. साध्यही चांगले व योग्य व साधनेही तशीच। म्हणूनच यशाचा रंग शुभ्र. रास शब्द विविध क्षेत्रात मिळवलेले यश सुचवतो म्हणजेच सर्वांगीण विकास. एका कवीने म्हटले आहे, 'सुवर्णभूमी म्हणूनी जियेची त्रिखंड भर कीर्ती " अर्थात संपन्न भूमी! विश्वाच्या कानाकोपऱ्यातून ज्ञान संपादनासाठी ह्या भूमीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवाह. आम्ही प्रगत झालो, तुम्हीही व्हा ह्या उद्देशाने - उंच पर्वत, विशाल सागर, शरीर गोठवणारी थंडी, रणरणती वाळवंटे कशालाही न जुमानता जगभर पोचलेले भारतीय संस्कृतीचे प्रसारक! गणित, विज्ञान, शिल्प, विणकाम, शेतीतील प्रयोग, साहित्य निर्मिती अशा विविध गोष्टीत भारतीयांनी प्राप्त केलेले प्राविण्य, स्त्रीबद्दलचा गौरव भाव असे विविधांगी यश मिळवणारा भारत आणि त्या यशाचे दृश्य स्वरूप हा हिमालय.

भारताने धारण केलेला रुप्याचा दिव्य मुकुटच! खरेतर चांदीपेक्षा सोने अधिक मूल्यवान असते. पण शुभ्रतेच्या कसोटीस मात्र चांदीच उतरते. विज्ञानातले एक सत्य येथे आठवते- तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, अस्मानी, नीळा, जांभळा ह्या सात रंगांचे मिश्रण म्हणजे पांढरा रंग.!
शुभ्रता हीच ज्याची ओळख त्या हिमालयाला वंदन असो.

भारतभूस्तोत्र -2

सागरा लिङ्गितां लक्ष्मीं जगज्जनक कन्यकां
स्थिताम हिमनगस्यांके पार्वतीमपरां भजे ।।२।।

१)लक्ष्मीचा जन्म सागरात झाला आहे असे मानले जाते. म्हणून सागराला आलिंगन देणारी त्याची कन्या लक्ष्मी असा अर्थ होईल. लिङ्गिनचा अर्थ चिन्ह धारण करणारा असा आहे. चिन्ह प्रत्यक्षात धारण केले नसले तरी सागराइतकी विशाल असाही अर्थ होईल. लिङ्गिनचा आणखी एक अर्थ हत्ती आहे व गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग विपुल संपत्ती ह्या अर्थी वापरला जातो. अशा लक्ष्मीला वंदन असो.

 २)जगज्जनक कन्यकां - जगत +जनक +कन्यकां - जगाचा जनक ब्रम्हा आहे व त्याची कन्या सरस्वती तिला नमन करत आहे. (येथे सरस्वती असा स्पष्ट उल्लेख नाही)

३)हिमानागास्यांके स्थिताम - अपरां पार्वतीम - हिमालयाच्या मांडीवर स्थित असलेल्या अतुलनीय पार्वतीला भजतो.
लक्ष्मी, सरस्वती व पार्वती ह्या तिघींना वंदन असो. मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी,धन, विद्या व स्थिरता ह्यांचेच जणू दर्शन होते.

हिमालयाच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या तेथील रानावनात विहार करणाऱ्या पार्वतीने, सर्वांचे मंगल करणाऱ्या (शं करोति इति शंकर:) शंकराला तो स्मशानवासी, बैरागी, निर्धन, अविकसित जमातीच्या लोकात वावरणारा आहे हे माहीत असूनही सर्व सामान्यांचा उध्दार करण्याची त्याची वृत्ती, हलाहलासारखे जालीम विष पिउन टाकण्याची त्याची तयारी व ते पिऊनही फक्त कंठ निळा होण्यापलीकडे त्याला काहीच अपाय झाला नाही इतकी त्याची शारीरिक शक्ती ह्या सर्वांचा मोह पडून त्याच्या प्राप्तीसाठी वर्षानुवर्षे केलेलं कठोर तप तिच्या दृढ निश्चयाचे व स्थिरतेचे दर्शन घडवतो.

आपण दिवाळीत लक्ष्मी पूजन करतो. नवरात्रात शारदेची सरस्वतीची आराधना करतो तर प्रत्येक युवती लग्नाआधी गौरीहर - पार्वती व शंकर ह्यांची पूजा करते. हरितालिकेलाही पार्वती तिच्या सखींसह पुजली जाते.

साधारणतया लक्ष्मी सरस्वती व दुर्गा ह्या त्रयीला पूजले जाते. वंदेमातरम गीतातही दुर्गा कमला व वाणी म्हणजेच पार्वती, लक्ष्मी व सरस्वती ह्या सर्वांचे दर्शन हे भारतमाते तुझ्यात घडते असे श्री. बंकिमचंद्र म्हणतात. काली हेही दुर्गेचेच रूप आहे. दुर्गेने अनेक अवतार धारण करून देवांना मदत केली आहे. स्त्रीची विद्वत्ता, स्व संरक्षण सिध्दता व शत्रू विनाशक शक्ती ह्या रुपांमधून दिसते.
वरील श्लोकात भारताचे दक्षिण ते उत्तर दर्शन घडते. सागर हा प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेला आहे तर उत्तर टोकाला हिमालय आहे.

जगज्जनक कन्यकां - भारतीयांनी ज्ञान विज्ञान कला भौतिक व अध्यात्मिक क्षेत्रात केलेली प्रगती ह्या वरून त्यांना सरस्वतीचे वरदान प्राप्त आहे हे कळते. तिला मध्यवर्ती स्थान आहे. ह्यातूनच स्पष्ट होतो, भारतीयांचा जीवनाबद्दल असलेला समतोल. भारत अध्यात्माच्या उच्च शिखरावर पोचलेला होता. (सरस्वती) पण त्याच वेळी त्याने भौतिक गोष्टींकडे (लक्ष्मी) दुर्लक्ष केलेले नव्हते. तसेच स्वत:चे अस्तित्व टिकावे ह्यासाठी इथे शौर्याची परंपरा निर्माण झाली आहे.(दुर्गा)

योगी अरविंद म्हणतात," कधी कधी भारत राखेचा ढिगारा झाल्यासारखा भासतो पण त्या राखेच्या अंतर्भागात धगधगणारी ठिणगी जर संधी सापडतच प्रज्वलित होते.

 एक विचारवंत श्री. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात, "भारताने संपत्ती मिळवली पण मदांध बनून इतरांना नृशंस वागणूक दिली नाही. सर्व जगाची शासकीय सत्ता मिळवून इतरांना गुलाम करण्याचा विचारही केला नाही व आजही तशी इच्छा नाही. तरीही भारताच्या सर्वंकष श्रेष्ठतेपुढे नतमस्तक होऊन सर्व विश्व त्याला गुरुस्थानी मानेल ही खात्री आहे व त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लक्ष्मी,दुर्गा व सरस्वती ह्या तिघींना वंदन म्हणजेच सर्वांगीण प्रगतीची अपेक्षा!
 

 

मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

भारतभूस्तोत्र -1

 वंदे मातरमव्यक्तां व्यक्तांच जननीं परां
दीनोSहं बालक: कांक्षे सेवां जन्मनि जन्मनि ।।१।।
एका कवीने म्हटले आहे, 
"हा भारत नाचवी ज्याच्या भक्तीचा सिंधू । तोच खरा हिंदू ।।

भारतभू बद्दल अनेक कवींनी अनेक लेखकांनी भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांनी अगदी भरभरून लिहिलेले आढळते. बंकीमाचान्द्रांचे वन्दे मातरम आजही आबालवृध्दांच्या ओठावर आहे.

तुम्ही आम्ही समितीसेविका रोज "नमो भारत जनन्ये। स्वाभिमान प्रतीमाये"  असे म्हणत सकाळी सकाळी भारतमातेला वंदन करतो. 
"नित्यं वदामि सुगुणान तव जन्मभूमे" यासाठी उत्सुक असतो आणि भारतभूमीचा गौरव, कौतुक, श्रेष्ठता गाता गाता थकून जातो तरी वर्णन संपत नाही. अनंत रत्न मंदिरं अगाध ज्ञान सागरं" अशी कितीतरी विशेषणे एका पाठोपाठ एक उद्गारत 'नमामि राष्ट्र भारतं" म्हणत तिला नमस्कार करतो. प्रत्येक भारतीयाचा भावनासागर उचंबळेल अशा भारत भू स्तोत्राबद्दल आपण विचार करणार आहोत.

 १० कडव्यांच्या या स्त्रोत्रातील पहिले कडवे वन्दे मातरं ने सुरु झाले आहे. त्या परां जननीला आपण अभिवादन करत आहोत. त्याच वेळी व्यक्तां व अव्यक्तां ह्या दोन विशेषणांनी तिचे विशालत्व दर्शवले गेले आहे.

आपल्या प्राचीन ते अर्वाचीन साहित्यात व्यक्तिविकासाचा सोपान व्यक्ति, समष्टि, सृष्टि, परमेष्टी असा वर्णिलेला आढळतो. त्यातील सृष्टीचा विचार चराचर (चर +अचर ), सजीव निर्जीव अशा व्यापक शब्दाने करतो तरीही चराचर सृष्टि ही व्यक्त आहे. तिची निर्मिती झाली आहे म्हणून व्यक्ताम च्या पुढे जननीं -जन्म देणारी असा उल्लेख आहे. त्याहीपेक्षा विशाल कल्पना अव्यक्तां ह्या शब्दांत व्यक्त होते.

माता ही व्यक्त तर मातृत्व भाव अव्यक्त असतो. प्रेमळ स्पर्श, कल्याणाची चिंता, बालकाच्या सुखासाठी चाललेली धडपड ह्या गोष्टी ह्या मातृत्वभावाला काही प्रमाणात व्यक्त करतात. पण जसा हिमनगाचा ५/६ भाग पाण्याखाली असतो, फक्त १/६ भाग पाण्यावर दिसतो. तसा हा मातृत्व भाव मोठ्या प्रमाणात अव्यक्तच राहतो. जननी रूपातून व्यक्त झालेल्या पण कितीतरी पटींनी अव्यक्त असणाऱ्या ह्या भारतभू ला आम्ही वंदन करतो. पर्वत, नद्या, सागर, खनिज संपत्ती, वृक्ष संपत्ती, धान्य समृद्धी वगैरे व्यक्त गोष्टी आहेतच पण विदेशातून प्रवास करून आल्यानंतर भारत भू वर पाउल ठेवल्या ठेवल्या येथील माती कपाळाला लावून आनंदित झालेल्या स्वामी विवेकानंदासारख्यांचे समाधान हे तिचे अव्यक्त रूप आहे.

अशा ह्या मातेची सेवा जन्मोजन्मी करण्याची आकांक्षा आहे. कदाचित मी 'दीन' असेन पण माझा सेवाभाव मात्र समृध्द आहे. म्हणून अनेक जण जन्म जन्मांतरी भारतातच जीवन प्राप्त होवो अशी इच्छा व्यक्त करतात. किंबहुना तशी खात्री बाळगतात. मग फाशीची शिक्षा झालेला एक तरुण सहज उद्गारतो," भेटेन ९ महिन्यांनी "

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

चिंतनसूत्र- ७ श्रोतागण

संत ज्ञानेश्वरजीने सामने बैठे वाले श्रोतागणको वंदन करते हुए कहा, 
शरदऋतु के चंद्रप्रकाश में कोमल अमृतकण चुगनेवाले आप चकोर है।कमलदलको ज़रा भी धका न लगाते हुए परगसेवन करनेवाले आप भ्रमर हो| 
स्वयं का स्थान न छोड़ते हुए भी चंद्रमाको आलिंगन देनेवाली कमलिनी जैसी आपकी माया है।
अपने बच्चे के कर्तृत्वसे संतुष्ट होनेवाली माता जैसा आपका प्यार है।
आपके सामने विषय प्रतिपादन करना यह मानो -
सरस्वतीपुत्र को पढ़ाना जैसा है।
सूरज के सामने जुगनू का प्रकाश। 
अमृत के थालीमे मिष्टान्न परोसना|
शीतल चन्द्र को पंखा ढालना|
नादब्रम्ह को संगीत सुनाना|
गहनोंको गहने चढ़ाना|
सागर को स्नान डालना|
सुगंध को इत्र अर्पित करना|
आप सब प्रेमभरे होने के कारणही मैं आपके सामने बोल सकता हूँ।

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

चिंतनसूत्र ६ - गुरुमहिमा

संत ज्ञानेश्वरने गुरू के प्रति आदर व्यक्त करते हुए कहा हैं, आप भवरूपी तमको नष्ट करनेवाले भास्कर हो। आपका सामर्थ्य अतुलनीय है। आप मानों भक्तोंके वन के चंदन हो। आपकीही क्षमाशीलता इस पृथ्वी ने अपनायी है। आकाशने आपसेही विशालत्व प्राप्त किया है । भवसागर के मदसे भरे हुए हाथीका गंडस्थल भंग करने आप समर्थ हो। विषयवासना के सर्पका जहर आपकी कृपासे नष्ट होता है। आपकी कृपासे विद्या का कमल खिलता है। अविद्या की रात समाप्त हो जाती है।

आपका स्तवन करना चाहता हूँ, लेकिन करुँ कैसे?
क्या कर्पूर को सुगंध अर्पित किया जा सकता है?
क्या चंदनको सुगंधित द्रव्य लगानेकी आवश्यकता है?
 क्या अमृतको पकाया जा सकता है?
क्या गगनपर कोई ध्वज लगा सकता है?
 क्या कल्पतरुको फूलोंकी जरुरत है?

 फिर भी यदि स्तवन करूँगा तो मानों
 मोतियोंको अभ्रक का लेप लगाये जैसा होगा।
 शुध्द सुवर्णको रजत का पानी देने जैसा होगा।
 फिरभी आपका ममत्व मुझे आपका स्तवन करने विवश कर रहा है। 

मुझे ज्ञात है कि उपमन्युने जब दूध माँगा तब शिवजीने उसके लिए क्षीरसागर निर्माण किया। बाल ध्रुव रूठ गया तो विष्णुजीने उसे अटल, अचल ध्रुवपद प्रदान किया। आपकीही कृपासे विश्वामित्रजी ने प्रतिसृष्टी निर्माण की।श्रीरामजी की वानरसेना सागर उल्लंघन कर सकी।

आपके इस स्तवनसे मैं कृतकृत्य हुआ हूँ । सभी लोगोंको आपकी कृपा प्राप्त हो। 

चिंतनसूत्र ५ - धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे


भारतीयोमे कर्तव्योंकी सीढ़ी का एक क्रम मान लिया है। वह है व्यक्ति, परिवार, समाज, राष्ट्र और विश्व । 'कृण्वन्तो विश्वमार्यम' की उद्घोषणा के अनुसार विश्व को श्रेष्ठ बनाने के लिये हम प्रतिबद्ध है। व्यक्ति और परिवार के उन्नयन के लिये स्वाभाविक रूपसे हम प्रयत्नशील रहते है। समाज के प्रति दायित्व का बोध हमें प्रयत्नपूर्वक ध्यान में रखना पडता है।

समाज सजीव होनेके कारण समाजमे उतार चढाव होतेही रहते है। कभी कभी अधर्म का अवडंबर मच जाता है। ऐसे समय अधर्म को नष्ट कर धर्म को प्रस्थापित करने भगवान अवतार धारण करते है, यह हमारा विश्वास है और उसकी अनुभूति हमें बारबार आती है।

हमारे दशावतार, साधू संत, चंद्रगुप्त, शिवाजी जैसे राष्ट्र पुरुष, परकीय सत्ता से समाज को मुक्त करने अपना सर्वस्व समर्पण करनेवाले वीर, समाजोत्थान के लिये प्रयत्नशील रहे चाणक्य, रामदास, लोकमान्य तिलक, न्या.महादेव रानडे, महात्मा गांधीजी, स्वातंत्र्यवीर सावरकर जैसे नेतागण, रणरागिणी लक्ष्मी, समाज का स्वाभिमान जागृत करनेवाली तथा उसकी सेवा करनेवाली देवी अहल्याबाई, शिवाजी जैसा स्वतंत्रता प्राप्त करनेवाला वीर निर्माण करनेवाली जिजामाता आदियोंके चरित्रमे इसका अनुभव होता है और हरेकको अपना दायित्व निभानेका संदेश प्राप्त होता है।

ज्ञानेश्वरीमें वर्णन है कि भगवान कहते है, मै
१) अज्ञान का अंधेरा प्राशन कर लेता हूँ।
२) अधर्म की सीमाये तोड देता हूँ।
३) सज्जनोंद्वारा सुख की ध्वजा लहराता हूँ।
४) अविवेक की कालिमा नष्ट करता हूँ।
५) विवेक का दीप जलाता हूँ।
६) पाप का पहाड नष्ट भ्रष्ट करता हूँ।
हरेक व्यक्तिने अपना दायित्व और कर्तव्य जानकर उसे निभाने कटिबध्द रहना है।


चिंतनसूत्र ४ - स्वधर्मे निधनं श्रेय:


धर्म का अर्थ है कर्तव्य। हरेक व्यक्ति का समाज में जो स्थान है उसपर उसका कर्तव्य निर्भर रहता है। समाजरचना में उस कर्तव्य का एक विशेष स्थान रहता है। वह न निभानेसे गड़बड़ी हो सकती है। कभी कभी अन्य कर्तव्य धारण करनेवालोंको देखकर, मैं भी वैसा करुं यह भाव निर्माण हो सकता है। 
 ज्ञानेश्वरीमें कहा है, 
१. पड़ोसीका बड़ा मनोहर पक्का बंधा हुआ घर देखकर मैंने अपनी कुटी मोड़ डालना क्या ठीक रहेगा? (साथ ही साथ स्वातंत्र्यवीर सावरकरजी की याद आती है। उन्होंने कहा है," मेरी कुटीही मुझे बहुत प्यारी है। )
२. पत्नी की क्षमता, उसके गुण, कर्तव्यतत्परता, स्वजनोंके प्रति होनेवाली ममता तथा कर्तव्य भाव, त्याग करनेकी तैय्यारी आदि गुणोंपर परिवार की खुशहाली निर्भर है। अत: उसके सौंदर्य की चर्चा करना आवश्यक नहीं है।
३. शायद स्वकर्तव्याचरण करना कष्टप्रद होगा लेकिन वही करना योग्य है। 
४. परधर्म का आचरण करनेका मोह अयोग्य है। दूध में शक्कर डाली तो वह अधिकही रचकर होता है लेकिन जिसके पेटमें कृमी हो गए है उसके लिए वह हानिकारक होता है। 
साथही साथ यहभी ध्यान में रखना है कि एकही व्यक्ति को अनेक कर्तव्य एकसाथ निभाने पड़ते है। मैं एक कन्या, भगिनी, पत्नी, माता हूँ, साथ साथ राष्ट्र की सेवा के लिये बध्द परिकर समाज का एक घटक भी हूँ।
 'स्वधर्मे, स्वमार्गे परमंश्रद्धया' अविचल रहने का मेरा अड़िग प्रण है।