१. कदार्थितस्यापिही धैर्यवृत्तौ | न शक्यते धैर्य गुण: प्रमाष्टर्म ||
अधोमुखस्याsपि कृतस्य वन्है: नीधरिखा यान्ति कदाचिदव ।।
तिरस्कृत झाला तरी धैर्यवानाचे धैर्य नष्ट होत नाही. अग्नीची ज्वाळा खाली मुख केले तरी कधी खाली जात नाही. वरच उफाळते.
२. रत्नेर्महार्हेनस्तु तुप्युर्न देवा:। न भेजिरे भीमविशेष भीतम ।
सुधांबिना न प्रययुरविराम न निश्चितार्थातद विरमंती वीरा:।
मौल्यवान रत्ने देवांना संतुष्ट करु शकली नाहीत. महाभयंकर विषानेही त्यांना भीती वाटली नाही. अमृत मिळाले तरी ते थांबले नाहीत. जे साध्य निश्चित केले आहे ते प्राप्त झाल्याशिवाय धैर्यवान लोक विश्रांती घेत नाहीत.
३. अंगणवेदी वसुधा कुत्या जलधी स्थलिच पातालम
वल्मिकश्च सुमेरु: कृतप्रतिज्ञस्य धीरस्य ।।
वसुधा म्हणजे अंगणातील ओटा, समुद्र म्हणजे लहानसे डबके, पाताल म्हणजे एक छोटीशी जागा, सुमेरु म्हणजे एक वारुळ असे प्रतिज्ञा केलेल्या धीराना वाटते.
४. निदन्तु नीतिनिपुणा : यदि वा स्तुवंतु।
लक्ष्मीसमाविशतु वा गच्छति यथेष्टम।
अधेव वा मरणमस्तु युगान्तरे वा
न्यायात्पथ : प्रविचलन्ति पदं न धीरा: ।।
नीतिज्ञ लोक निंदा करोत वा स्तुती करोत, लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे येवो वा जावो, आज मरण येणार असेल वा युगान्तराने, धीर लोक न्यायपथापासून आपला पाय कधीच विचलित होऊ देत नाहीत.
गणी न आपदा । धीर नर कदा ।
ध्येयी घेई सदा छंदा sss ।।
रवि अपुला पथ आक्रमी ।
जरी पाही वैरीsss ग्रासू
खल मेघ आडवी पाया SSS ।।
५. चलन्ती गिरिय:कामं युगांत पवनाहता:
कृछेपि न चलत्येव धीराणां निश्चलं मन:
कल्पांताच्या वाऱ्याने आहत होउन पर्वत एकवेळ विचलित होईल पण प्रायश्चित्त करावे लागले तरी धीर लोकांचे निश्चल मन कधी बदलत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा